Sunday, February 9, 2014

नक्षत्र म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रातील एक अविभाज्य भाग म्हणजे नक्षत्र आहे. त्या शिवाय पारंपारिक ज्योतिषशास्त्रातील फलादेशाची अचुकता पुर्ण होत नाही. आकाश हे पुर्ण ३६० अंशानी व्यापले आहे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील फलादेश हा भाग ग्रहांचे कोणत्या राशीत आणि कोणत्या नक्षत्रांत आहे त्यावर आधारभुत असते. ह्या महाकाय पृथ्वीवरील हे आकाशामध्ये बरेच तारे व ताऱ्यांचे समुह आहेत. विशेष करुन जन्मनक्षत्र (चंद्रनक्षत्र) सुर्यनक्षत्र आणि महत्वाचे लग्ननक्षत्रांचा विचार करुन तसेच हि नक्षत्रे कोणत्या भावात आहेत त्यावरुन फलादेश दिल्यास तो व्यवस्थित ठरू शकतो. ताऱ्यांच्या समुहांचा (नक्षत्रांचा) उल्लेख आपणास रामायण, महाभारत, उपनिषद तसेच वेदांमध्ये आलेला आहे. तसेच नक्षरति इति नक्षत्र म्हणजे ताऱ्यांच्या समुहातील तारा कधीही तुटून पडत नाही. अशा प्रकारे चकाकणारे, विशिष्ट आकाराचे ह्या ताऱ्यांच्या समुहाला ‘’ नक्षत्र ‘’ म्हणतात. हे ताऱ्यांचे समुह (नक्षत्र) स्थिर असतात पण सुर्यमालेतील ९ ग्रह गतीशील असतात. हे सर्व ग्रह पृथ्वीच्या भोवती ३६० अंशात त्यांच्या वैयक्तित गतीप्रमाणे फिरत असतात. ह्या पृथ्वीभोवतीच्या ३६० अंशाच्या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी हे ताऱ्यांचे समुह स्थिर असतात. एकुण मुख्य नक्षत्र २७ मानली गेली आहेत व लहान एक २८ वे नक्षत्र मानले गेलेले आहे. जर ही २७ नक्षत्रे ३६० अंशात विभागली असतील तर प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती १३ अंश २० कला एवढी असते व राहिलेले ३ अंश ६ कला हे २८ व्या नक्षत्राची व्याप्ती आहे. ह्या ३६० अंशामध्ये ज्या वेगवेगळ्या अंशावरती जे हे ताऱ्यांचे समुह असतात त्यांनाच ‘’नक्षत्र‘’ असे म्हणतात.
पृथ्वी भोवतील आकाश हे ३६० अंशानी व्यापलेले आहे व ते विशिष्ट दिशेला विशिष्ट अंशात व्यापलेले आहे व ते असे
         ज्योतिषशास्त्रातील एक अविभाज्य भाग म्हणजे नक्षत्र आहे. त्या शिवाय पारंपारिक ज्योतिषशास्त्रातील फलादेशाची अचुकता पुर्ण होत नाही. आकाश हे पुर्ण ३६० अंशानी व्यापले आहे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील फलादेश हा भाग ग्रहांचे कोणत्या राशीत आणि कोणत्या नक्षत्रांत आहे त्यावर आधारभुत असते. ह्या महाकाय पृथ्वीवरील हे आकाशामध्ये बरेच तारे व ताऱ्यांचे समुह आहेत. विशेष करुन जन्मनक्षत्र (चंद्रनक्षत्र) सुर्यनक्षत्र आणि महत्वाचे लग्ननक्षत्रांचा विचार करुन तसेच हि नक्षत्रे कोणत्या भावात आहेत त्यावरुन फलादेश दिल्यास तो व्यवस्थित ठरू शकतो. ताऱ्यांच्या समुहांचा (नक्षत्रांचा) उल्लेख आपणास रामायण, महाभारत, उपनिषद तसेच वेदांमध्ये आलेला आहे. तसेच नक्षरति इति नक्षत्र म्हणजे ताऱ्यांच्या समुहातील तारा कधीही तुटून पडत नाही. अशा प्रकारे चकाकणारे, विशिष्ट आकाराचे ह्या ताऱ्यांच्या समुहाला ‘’ नक्षत्र ‘’ म्हणतात. हे ताऱ्यांचे समुह (नक्षत्र) स्थिर असतात पण सुर्यमालेतील ९ ग्रह गतीशील असतात. हे सर्व ग्रह पृथ्वीच्या भोवती ३६० अंशात त्यांच्या वैयक्तित गतीप्रमाणे फिरत असतात. ह्या पृथ्वीभोवतीच्या ३६० अंशाच्या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी हे ताऱ्यांचे समुह स्थिर असतात. एकुण मुख्य नक्षत्र २७ मानली गेली आहेत व लहान एक २८ वे नक्षत्र मानले गेलेले आहे. जर ही २७ नक्षत्रे ३६० अंशात विभागली असतील तर प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती १३ अंश २० कला एवढी असते व राहिलेले ३ अंश ६ कला हे २८ व्या नक्षत्राची व्याप्ती आहे. ह्या ३६० अंशामध्ये ज्या वेगवेगळ्या अंशावरती जे हे ताऱ्यांचे समुह असतात त्यांनाच नक्षत्रअसे म्हणतात.
पृथ्वी भोवतील आकाश हे ३६० अंशानी व्यापलेले आहे व ते विशिष्ट दिशेला विशिष्ट अंशात व्यापलेले आहे व ते असे
१) पुर्व ते दक्षिण     = ० ९० अंशात
२) दक्षिण ते पश्चिम  = ९० १८० अंशात
३) पश्चिम ते उत्तर    = १८० २७० अंशात
४) उत्तर ते पुर्व        = २७० ३६० अंशात
ह्या २७ नक्षत्रांचे प्रत्येकी ४ पद किंवा चरण असतात. म्हणजेच प्रत्येक नक्षत्र १३ अंश २० कलांचे असते आणि ही प्रत्येक चरणे ३ अंश २० कलांची असतात. ह्या प्रत्येक पदाला किंवा चरणाला ज्योतिषशास्त्रात असे विशिष्ट स्थान किंवा महत्व आहे. ह्या १२  राशी प्रत्येकी ३० अंशाची असते.
(३६०/१२=३० अंश) किंवा प्रत्येक राशीला ९ पदे असतात. म्हणजे ९ पदे ३ अंश २० कला = ३००  एकुण २७ नक्षत्रे व त्यांची प्रत्येकी ४ पदे म्हणजेच १०८ पदे/चरणे आहेत.
   नक्षत्रांचे अजुन एक वैशिष्ट म्हणजे मराठी महिन्यांची नावे ही नक्षत्रांवरुण ठरलेले आहेत. म्हणजेच पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात  असतो त्या नक्षत्रावरून ठरले आहे. उदा. चैत्र महिन्यात चंद्र चित्रा नक्षत्रात असेल तर तो चैत्र महिना.पौर्णिमेला चंद्र मृग नक्षत्रात असेल तर तो मार्गशीर्ष महिना.
   खालील नक्षत्रे ही शुभ मानली गेली आहेत.  
    १) अश्विनी २) रोहिणी ३) मृगशीर्ष ४) पुनर्वसु ५) पुष्य ६) उत्तरा ७) हस्त ८) चित्रा ९) स्वाती १०) अनुराधा ११) उत्तराषाढा १२) श्रवण १३) धनिष्टा १४) शततारका १५) उत्तराभाद्रपदा १६) रेवती                
     पंचक नक्षत्रे :
   चंद्र ज्यावेळी कुंभ आणि मीन राशीतुन भ्रमण करत असतो त्यावेळी ज्या पाच नक्षत्रातुन जात असतो त्यास पंचक असे म्हणतात. ती नक्षत्रे अशी
१)धनीष्ठा २) शततारका ३) पुर्वाभाद्रपदा ४) उत्तराभाद्रपदा ५) रेवती

                                                         ग्रह आणि त्यांची नक्षत्रे                                              प्रत्येक ग्रहांसाठी तीन नक्षत्रे वाटुन दिलेली आहेत व त्यावर त्या ग्रहांचा अंमल असतो ती खालीलप्रमाणे                                         
   ग्रह
                            नक्षत्रे
केतु
अश्विनी
मघा
मुळ
शुक्र
भरणी
पुर्वाफाल्गुनी
पुर्वाषाढा
रवि
कृतिका
उत्तराफाल्गुनी
उत्तराषाढा
चंद्र
रोहिणी
हस्त
श्रवण
मंगळ
मृगशीर्ष
चित्रा
धनिष्ठा
राहु
आर्द्रा
स्वाती
शततारका
गुरु
पुनर्वसु
विशाखा
पुर्वाभाद्रपदा
शनि
पुष्य
अनुराधा
उत्तराभाद्रपदा
बुध
आश्लेषा
जेष्ठा
रेवती

                                                                                            
     ज्या वृक्षाची आराधना/पूजा केली जाते तो आराध्यवृक्ष होय.भारतीय पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते. आयुर्वेदानुसार,प्रत्येक वृक्ष हा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात औषधीच आहे. विशीष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तिसाठी विशीष्ट वृक्षाची आराधना ही फलदायी होते. किमान २१ दिवस वृक्षाची आराधना करावी.हे आराध्यवृक्ष देवतासमान असल्यामुळे त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तिंनि त्याला औषधासाठीहि तोडु नये. याच